सूचना:- या यशोगाथा सविस्तर वाचण्यासाठी प्रत्येक पोस्टच्या हेडलाईन वर क्लिक करा .

कचऱ्याचा राक्षस अन् विज्ञानाचे अस्त्र 
स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की.

अंधांसाठी 'सर्पस्पर्श' पुस्तकाचे वरदान 
डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे.

बाल कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी 
आपला देश कृषी प्रधान देश म्हणून जगविख्यात आहे. शेती हीच आपली जीवनदायिनी आहे. मात्र आता बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कृषी विकास व कृषी उत्पादन वाढविणे काळाची गरज ठरत आहे.

'एकलव्य' 
सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..

राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे: देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी 
प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित पथसंचलनात नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकांचे नेतृत्व करणारे अमन जगताप व खुशबू जोशी हे महाराष्ट्राचे तारे चमकले.

अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल 
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

शालेय पोषण आहार योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली शिक्षणाची गोडी 
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना 18 जून 2009 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2011 अन्वये शालेय पोषण आहार योजना लागू झालेली आहे.

बागेसाठी बाल बँक 
बागेसाठी बाल बँक : पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी शाळेचा उपक्रम

फिरती शाळा एक अभिनव उपक्रम 
विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.

एका आयडियाने गाव झाले WI-FI, गरीबांना FREE इंटरनेट 
धरमपुरी (इंदूर, मध्य प्रदेश)- सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ उचलत आहेत.

फ्रीडम वॉल 
ग्रामीण शाळेतील मुलं शहरी भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे चुटूचुटू बोलत नाहीत. यामध्ये मुख्य अडसर असतो तो भाषेचा !

शिक्षण – एक चांगली सवय 
शिक्षण – एक चांगली सवय

Post a Comment

Previous Post Next Post